महाराष्ट्र

ठाकरे सरकारने अहंकारामुळे शहाणपण गमावलं – आशिष शेलार

Published by : Lokshahi News

सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभेच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान १२ आमदारांवर सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा देशातील लोकशाहीला अंजन ठरणार आहे, असं भाजप नेते आशिष शेलार म्हणाले.

ठाकरे सरकारने अहंकारामुळे शहाणपण गमावलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या ऐतिहासिक निर्णयात एका पार्श्वभूमी असलेल्या विधीमंडळाला, सरकारला आणि महाराष्ट्राला या ठाकरे सरकारच्या तर्कहीन, अवैध आणि असैविधानिक अशा ठरावामुळे इजा पोहोचलेली आहे. ही इजा आणि अवास्तव महाराष्ट्रामध्ये होणारी चर्चा देशात रोखता आली असती. परंतु ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेलेला आहे. आम्हाला कुठल्याही व्यवस्था मान्य नाहीत.

निलंबनाचा ठराव सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या पीठाने रद्द केला आहे. संपूर्ण अजूनही जजमेंट येणं बाकी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डर आणि जजमेंटसाठी स्वत: मी ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित होतो. ज्या ठरावाने हे निलंबन करण्यात आलं होतं. तो ५ जुलै २०२१ चा ठराव सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ऑपरेटीव्ह ऑर्डरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की, ठाकरे सरकारने केलेला ठराव असैविधानिक, अवैध आणि तर्कहीन आहे. अशा पद्धतीचे तर्कहीन ताशेरे विधीमंडळ आणि सरकारवर महाराष्ट्राच्या पहिल्यांदा आलेले आहेत. अशा पद्धतीचा ठराव करणाऱ्या सरकारच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून कान उघडणी करण्यात आली होती, असं आशिष शेलार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा