महाराष्ट्र

कृष्णवंती नदीत गेली कार; क्रेटामधील दोन जणांचा गुदमरून मृत्यू

बोलेरो गाडीतून आलेला एक वृध्दही पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावंती नदीत वाहून गेला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

आदेश वाकळे | संगमनेर : कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या पेंडशेत शिवारातील ओढ्यात औरंगाबाद येथील पर्यटकांच्या गाडीला शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता अपघात झाला. वळणाचा अंदाज न आल्याने क्रेटा कार थेट कृष्णवंती नदी पात्रात बुडाली. या अपघातात क्रेटा मधील दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तर तिसरा काचेतून उडी मारून बचावला. त्याच वेळी बोलेरो गाडीतून आलेला एक वृध्दही पाण्याचा अंदाज न आल्याने कृष्णावंती नदीत वाहून गेला.

वकील आशिष प्रभाकर पोलादकर (वय ३४, रा.सिल्लोड), रमाकांत प्रभाकर देशमुख (वय ३७, रा. , ता.कन्नड), वकील अनंत रामराव मगर (वय ३६, रा.हिंगोली) येथील युवक हे संगमनेरला त्यांच्या मित्राकडे कार्यक्रमानिमित्त आले होते. जवळच भंडारदरा असल्याने तो पाहण्यासाठी पर्यटनासाठी ते तिघे निघाले होते. मात्र, त्यांचा रस्ता चुकल्याने ते सरळ वाकी मार्गे वारूंघुशि फाट्याच्या पुढे गेले.

रस्ता चुकला लक्षात येताच रात्री साडेआठ वाजता ते कळसुबाईकडून भंडारदराच्या दिशेने निघाले. यावेळी पेंडशेत फाट्यावर एका अवघड वळणावर रस्त्याचा अंदाज आला नाही. व त्यांची क्रेटा कार थेट जाऊन कृष्णवंती नदीपात्रात बुडाली. त्याच वेळी बोलेरो गाडीतून एक प्रवासी लघु शंकेसाठी थांबला, परंतु, नदीच्या पाण्याचा प्रवाहात तोही वाहून गेला. दरम्यान, ट्रॅक्टर आणि जेसीबीने गाडी बाहेर काढून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजूर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा