महाराष्ट्र

आधिवासी बांधवांना दिलासा, महसूल विभागाने ३०६ हेक्टर वनहक्क जमिनी नावे केल्या

Published by : Lokshahi News

संदीप गायकवाड | वसईमधील ५० आधिवासी बांधवांना आज वसईच्या महसूल विभागाने ३०६ हेक्टर वनहक्क जमिनी त्यांच्या नावावर केल्या आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हे गिफ्ट आधिवासी बांधवाना मिळाल्याने त्यांच्यात आनंदाचा वातावरण आहे. 

वसईच्या महसूल विभागाने अधिवासी बांधवांनी अतिक्रमण केलेल्या वनजमिनीवरील त्यांच्या नावे वनपट्टी लावल्या आहेत. वनजमिनीवर आपल्या नावे वनपट्टी लावण्यासाठी आधिवासी बांधवांनी तब्बल ३५ ते ४० वर्ष शासनाशी संघर्ष केला होता. त्यानंतर १९९६ साली आधिवासी बांधवांच्या बाजूने वनहक्क कायदा काढला गेला. माञ त्यात बऱ्याच ञुटी होत्या. त्यानंतर २००६ साली त्यात सुधारणा करुन, नव्याने सुधारीत वनहक्क कायदा अंमलात आला. दरम्यान आधिवासीच्या वनजमिनी त्यांच्या नावावर झाल्या आहेत. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आधिवासीना वनपट्टी मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

वसई प्रांत अधिकाऱ्यांनी आज वसईतील भाताने, आडाणे, भिनार, सकवार, वाडघर येथील ५० आधिवासी बांधवाना ३०६ हेक्टर जमिनीच्या वनपट्टी त्यांच्या नावावर केल्या आहेत. यामुळे आता ते या जमिनीवर शासकीय योजनेचा लाभ घेतील. तसेच शेती, भाजीपाला लागवड करुन, उत्त्पन घेवू शकतात. त्यांच्या नावावर त्या जमिनीचा सातबारा ही आता करण्यात येणार आहे. त्यामुळे आता आधिवासी खऱ्याअर्थाने जमिनीचे मालक होणार असल्याच मत प्रांत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nitesh Rane On Thackeray Brothers : "यांच्यात नवरा कोण आणि नवरी कोण?" ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर नितेश राणेंची प्रतिक्रिया

Raj Thackeray : ''त्या' बद्दल दिलगिरी व्यक्त'; विजय मेळाव्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट

Shivsena on Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर शिवसेनेचे कडवट बोल ! मोठ्या भावावर निशाणा तर लहान भावाचे कौतुक

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे