महाराष्ट्र

उन्हाचे चटके असह्य! सलग तिसऱ्या दिवशी चंद्रपुरात तापमानाचा उच्चांक

चंद्रपूर शहरातील नागरिकांची वाढत्या तापमानाने लाहीलाही सुरु आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अनिल ठाकरे | चंद्रपूर : चंद्रपुरातील उन्हाळा साऱ्यांनाच नकोसा. जगातील सर्वाधिक उष्ण शहर अस ठळक अक्षरात चंद्रपूर शहराचं नाव कोरले गेले आहे. शहर इतक उष्ण का? याचे अनेक कारणे. मात्र या उष्ण शहरातील नागरिकांची वाढत्या तापमानाने लाहीलाही सुरु आहे.

मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी चंद्रपूर येथील तापमान 40 अंश सेल्सिअसचा वर गेले आहे. 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आज झाली आहे. बुधवारला राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूरात झाली होती. मंगळवारपासून तापामान वाढत चाललं आहे. एरवी दिवसभर धावत असणार शहर दुपारच्या वेळी ओस दिसू लागलं आहे. तापमानापासून बचाव करण्यासाठी शहरवासी विविध उपाययोजना अंमलात आणताना दिसत आहेत. थंड पदार्थांची मागणी वाढली आहे. पुढील काही दिवस तापमान वाढण्याची शक्यता वर्तविली गेली आहे. त्यामुळं उन्हाचा चटक्यापासून तूर्तास शहरवासियांची सुटका नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा