team lokshahi
महाराष्ट्र

वारसा नोंद होणार रद्द ; माणगाव ग्रामपंचायतीचा निर्णय

आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची ग्रामपंचायतमधील वारसा नोंद रद्द होईल असा निर्णय माणगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे.

Published by : Team Lokshahi

सतेज औंधकर|कोल्हापूर - मुलांनी आपल्या आईवडिलांचा सांभाळ करावा यासाठी पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांची महसूल विभागाची परवानगी घेवून ग्रामपंचायतमधील वारसा नोंद रद्द करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे नवीन वारसा नोंद करताना मुलांकडून आईवडिलांचा सांभाळ करीनं, तसं न झाल्यास कारवाईस पात्र राहिनं, अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र ही लिहून घेतलं जाणार आहे.

या निर्णयाचे जिल्ह्यातून स्वागत होत आहे. आईवडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगायचा पण वृद्धापकाळात आईवडिलांचा सांभाळ करायचा नाही, ही प्रवृत्ती समाजात वाढताना दिसत आहे. त्यामुळे म्हातारपणी आईवडिलांचे हाल होऊन त्यांच्यावर निराधार होण्याची वेळ येते. अशा घटनांना चाप बसावा आणि मुलांनी, आई-वडिलांचा सांभाळ करावा यासाठी माणगाव ग्रामपंचायतीने ही नामी शक्कल लढविली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबाचा अंत! "अन् कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले" जैश कमांडरचा मोठा खुलासा

Local Bodies Election Supreme Court : स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत मोठा निर्णय, पुढच्या वर्षी होणार निवडणुक प्रक्रिया; तारीख जाहीर

Empty Stomach Eating : रिकाम्या पोटी ब्रेड खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? वाचल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल...