महाराष्ट्र

Corona Third Wave | …तर जुलै महिन्यात तिसरी लाट येणार; आरोग्यमंत्र्यांचे मोठे विधान

Published by : Lokshahi News

बालाजी सुरवसे | महाराष्ट्र सध्या तीन टप्प्यात अनलॉंक करण्यात आला आहे. मात्र जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर महाराष्ट्रात तिसरी लाट जुलै महिन्यातच येईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

उस्मानाबादमध्ये बोलताना राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दोन मतप्रवाह आहेत.काही सप्टेंबर तर काही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येईल असा मतप्रवाह असल्याचे सांगितले.

राज्यात निर्बंध कमी केल्याने गर्दी होत आहे. पण लाट रोखणे हे नागरिकांच्याच हातात आहे.स्वयंशिस्त गरजेची आहे, नियम नाही पाळले तर तिसरी लाट जुलै महिन्यातच येईल असा इशाराच त्यांनी दिला आहे. तसेच या लाटेविरुद्ध लढा देण्यासाठी औषधे व इतर व्यवस्था केली आहे.त्यासाठी लागणारी आर्थिक तरतुद 5 जुलै अधिवेशनात मान्यता दिली जाईल, असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा