Uddhav Thackeray 
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस; परभणी आणि जालन्यात साधणार शेतकऱ्यांशी संवाद

परभणी आणि जालन्यात साधणार शेतकऱ्यांशी संवाद

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

  • उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज शेवटचा दिवस

  • परभणी आणि जालन्यात साधणार शेतकऱ्यांशी संवाद

(Uddhav Thackeray) राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडाच्या दौऱ्यावर असून 5 ते 9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करत असून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधत आहेत.

धाराशीव, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा दौरा सुरू आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येणार होता, तर ही मदत पोचली का? याबाबतही शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेणार घेत असून आज उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे.

परभणी आणि जालन्यात उद्धव ठाकरे आज शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. जालनात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आज पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा