महाराष्ट्र

राज्यातील व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न

Published by : Lokshahi News

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी अनलॉक दरम्यान व्यापाऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सध्या कोरोनाच्या काळात सामान्य माणसांप्रमाणेच व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. त्याच अनुषंगाने येत्या आठवड्याभरात सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असं त्यांनी म्हटलंय.

तसेच पालिकेचे आयुक्त यांनी पत्र देखील लिहिले आहे. ज्या व्यक्तींनी लसींचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना विमान प्रवासाला परवानगी द्यावी, असे यामध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती शेख यांनी दिली. याचसोबत अशा व्यक्तींना बस आणि लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात यावी, असा विचार टास्कफोर्स करत आहे.

व्यापाऱ्यांना दुकान उघडण्याची वेळ वाढवून हवी आहे. १४ जुलैला या संदर्भात कॅबिनेट मीटिंग झाली. यातून व्यापाऱ्यांसाठी तोडगा काढण्याची आशा होती मात्र, ती फोल ठरली. यामुळे व्यापारी वर्गात नाराजीचा सूर आहे. विशेषत: छोटे खानी दुकानांना याचा मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो आहे. त्यामुळे लवकरच राज्य सरकार व्यापाऱ्यांसाठी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?