महाराष्ट्र

कल्याणच्या गांधारी पुलाला तडे ?; खबरदारी म्हणून वाहतूक बंद

Published by : Lokshahi News

सुरेश काटे । कल्याण गांधारी पुलावरील वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुरामुळे पुलाच्या पिलरला तडे गेल्याची माहिती मिळाल्याने पीडब्ल्यूडी विभागाने गांधारी पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. दरम्यान हा पूल कायमस्वरूपी वाहतुकीसाठी सुरु राहणार का याबाबद उद्या पाहणी झाल्यांनतर निर्णय होणार आहे.

भिवंडी पडघ्याच्या दिशेने वाहतुकीसाठी गांधारी पुलाचा वापर होतो. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भिवंडीत मुसळधार पावसामुळे पूर आला होता. या पुरामुळे पुलाच्या पिलरला तडे गेल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण गांधारी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडीने पुरामुळे पुलाच्या पिलरला तडे गेल्याची माहिती मिळाल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. रात्री माहिती मिळाल्याने सुरक्षिततेसाठी पुलावरील वाहतूक बंद करत या मार्गावरील वाहतुक भिवंडी मार्गावरून वळवण्यात आली आहे.

दरम्यान पुलाच्या पिलरला तडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर सध्या पूल बंद करण्यात आला आहे. तर उद्या सकाळी पीडब्ल्यूडीच्या बांधकाम विभागाकडून पाहणी झाल्यानंतर पुलाबाबत निर्णय होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा