महाराष्ट्र

कल्याणच्या गांधारी पुलाला तडे ?; खबरदारी म्हणून वाहतूक बंद

Published by : Lokshahi News

सुरेश काटे । कल्याण गांधारी पुलावरील वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुरामुळे पुलाच्या पिलरला तडे गेल्याची माहिती मिळाल्याने पीडब्ल्यूडी विभागाने गांधारी पुलावरील वाहतूक बंद करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. दरम्यान हा पूल कायमस्वरूपी वाहतुकीसाठी सुरु राहणार का याबाबद उद्या पाहणी झाल्यांनतर निर्णय होणार आहे.

भिवंडी पडघ्याच्या दिशेने वाहतुकीसाठी गांधारी पुलाचा वापर होतो. दरम्यान काही दिवसांपूर्वीच भिवंडीत मुसळधार पावसामुळे पूर आला होता. या पुरामुळे पुलाच्या पिलरला तडे गेल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कल्याण गांधारी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पीडब्ल्यूडीने पुरामुळे पुलाच्या पिलरला तडे गेल्याची माहिती मिळाल्याने पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. रात्री माहिती मिळाल्याने सुरक्षिततेसाठी पुलावरील वाहतूक बंद करत या मार्गावरील वाहतुक भिवंडी मार्गावरून वळवण्यात आली आहे.

दरम्यान पुलाच्या पिलरला तडे गेल्याची माहिती मिळाल्यानंतर सध्या पूल बंद करण्यात आला आहे. तर उद्या सकाळी पीडब्ल्यूडीच्या बांधकाम विभागाकडून पाहणी झाल्यानंतर पुलाबाबत निर्णय होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार