महाराष्ट्र

आजीच्या दशक्रीयेसाठी नदीवर अंघोळीला गेलेले दोघे बुडाले

Published by : Lokshahi News

आजीच्या दशक्रिया विधीसाठी नदीवर गेलेल्या दोन नातवांचा अंघोळ करतेवेळी बुडून मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी या गावामध्ये संबंधित घटना घडली आहे. मनीष टोपमे (वय-23वर्षे) व ईश्वर टोपमे (वय- 25वर्षे) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांचे नाव आहे.

या दोन्ही तरुणांच्या आजीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आज दशक्रियाचा कार्यक्रम गावातील एका नदीकाठीच्या मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी नातू मनीष व ईश्वर टोम्पे हे दोघेही नदीत आंघोळीला गेले. दरम्यान नदीला जास्त पाणी असल्याने हे दोघे भाऊ नदीतील भोवऱ्यात अडकले. यात त्यांचा मृत्यू झाला.

यावेळी नातेवाईकांनी नदीत उतरून या दोघांनाही जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने या दोघांचेही निधन झाले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा