महाराष्ट्र

आजीच्या दशक्रीयेसाठी नदीवर अंघोळीला गेलेले दोघे बुडाले

Published by : Lokshahi News

आजीच्या दशक्रिया विधीसाठी नदीवर गेलेल्या दोन नातवांचा अंघोळ करतेवेळी बुडून मृत्यू झाला आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी या गावामध्ये संबंधित घटना घडली आहे. मनीष टोपमे (वय-23वर्षे) व ईश्वर टोपमे (वय- 25वर्षे) असे नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोन तरुणांचे नाव आहे.

या दोन्ही तरुणांच्या आजीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आज दशक्रियाचा कार्यक्रम गावातील एका नदीकाठीच्या मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी नातू मनीष व ईश्वर टोम्पे हे दोघेही नदीत आंघोळीला गेले. दरम्यान नदीला जास्त पाणी असल्याने हे दोघे भाऊ नदीतील भोवऱ्यात अडकले. यात त्यांचा मृत्यू झाला.

यावेळी नातेवाईकांनी नदीत उतरून या दोघांनाही जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केला. परंतु दुर्दैवाने या दोघांचेही निधन झाले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."

Home Remedies To Relieve Mouth Pain : तोंडातील फोडं, जळजळ आणि वेदना? आता मिळवा त्वरित आराम!