महाराष्ट्र

मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद… मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊनची शक्यता

Published by : Lokshahi News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज ४.३० वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. यानंतर लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात दिवसा जमावबंदीची घोषणा केली आहे. तसेच सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत कडक संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या मिनी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरळीत असणार आहे.

मुंबईतही लॉकडाऊन लावण्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाऊनबाबत मानसिक तयारी करण्याचे आवाहन केले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द