महाराष्ट्र

मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद… मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊनची शक्यता

Published by : Lokshahi News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज ४.३० वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. यानंतर लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात दिवसा जमावबंदीची घोषणा केली आहे. तसेच सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत कडक संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या मिनी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरळीत असणार आहे.

मुंबईतही लॉकडाऊन लावण्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाऊनबाबत मानसिक तयारी करण्याचे आवाहन केले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा