महाराष्ट्र

मुख्यमंत्री साधणार जनतेशी संवाद… मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्यात लॉकडाऊनची शक्यता

Published by : Lokshahi News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 8.30 वाजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. राज्यभरात वाढत असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज ४.३० वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे. यानंतर लॉकडाऊनसंदर्भात मोठा निर्णय येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यात दिवसा जमावबंदीची घोषणा केली आहे. तसेच सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत कडक संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या मिनी लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा सुरळीत असणार आहे.

मुंबईतही लॉकडाऊन लावण्याचे संकेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही लॉकडाऊनबाबत मानसिक तयारी करण्याचे आवाहन केले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर