महाराष्ट्र

ShivSena SC Hearing : शिवसेना कुणाची? उल्हास बापट म्हणाले, कायद्यातून पळवाट...

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे यांनी याचिका दाखल केली होती. त्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला होता. या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि इलेक्शन कमिशनचा निःपक्षपातीपणे निर्णय येणे या दोनवर पुढचं राजकारण अवलंबून आहे. लवकर निर्णय घेतले जात नाही हा न्यायव्यवस्था आणि राजकारणातला दोष आहे. कायद्यातून पळवाट शोधल्या जातात. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना वेळ दिला पणं तो उलटून गेला याचा दुरूपयोग केला जातो. बहुमत शिंदेकडे असेल तरी पाहिले दोन भाग हे उद्धव ठाकरेंकडे आहेत. विधानसभेचे आमदार यांचं बहुमत धरलं तर त्याने लोकशाहीची विकृती होईल. ठाकरेंना सोडून गेलेले आमदार हे पक्षाच्या नाव आणि चिन्हावर निवडून आलेत व्यक्तिगत निवडून आली नाही. लोकप्रतिनिधींना अनेक मार्गांनी बाहेर खेचलं हे लोकशाहीला फार घातक आहे, असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jayant Patil Ganpati Visarjan : जयंत पाटलांच्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन

Latest Marathi News Update live : अनंत चतुर्दशीनिमित्त पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर आज घरगुती बापांचा विसर्जन संपन्न

Mumbai Police : मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारे जेरबंद, पोलिस चौकशीत धक्कादायक खुलासा

Eknath Shinde Borivali Kora Kendra : कोराकेंद्रमध्ये भाद्रपद शुक्ल चतुर्दशी संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंची उपस्थिती