महाराष्ट्र

अमरावतीत विनापरवानगी मिरवणूका, मेळावे घेण्यास बंदी

Published by : Lokshahi News

सुरज दहाट, अमरावती | अमरावती शहरात 12 नोव्हेंबर रोजी घडलेल्या हिंसाचारानंतर १३ दिवसांपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच पूर्व परवानगीशिवाय मिरवणूका, मेळावे घेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

अमरावतीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शहरात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 व 36 कलम लागू करण्यात आली आहे. हा आदेश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी जारी केले आहेत. पोलीस आयुक्त यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय सर्व प्रकारचे मोर्चे, मिरवणुका, मेळावे, धरणे, आंदोलने, शोभा यात्रा, धार्मिक दिंडी, रास्ता रोको व इतर कोणत्याही प्रकारच्या जमावास बंदी घालण्यात आली. जर कोणाला असे कार्यक्रम घ्यावयाचे असल्यास पोलीस आयुक्त यांच्याकडे तसा लेखी अर्ज करावा.

पोलीस आयुक्त यांचे पूर्व परवानगीशिवाय क्रीडा विषयक सर्व स्पर्धा तसेच सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणारे सर्व मेळावे, रंगभूमीविषयक प्रयोग व इतर प्रयोग यांना पोलीस आयुक्त यांचे पूर्व परवानगीशिवाय बंदी घालण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ