महाराष्ट्र

Vidhan Parishad Election : शिवसेनेनं एकही मत काँग्रेस दिलेलं नाही?

तिसऱ्या पसंतीचे मत ठरवणार काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर तिसऱ्या पसंतीचे मत काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय ठरवणार आहे.

विधान परिषदेच्या 10 जागांसाठी महाविकास आघाडीकडून 6 तर भाजपकडून 5 उमेदवार लढत आहेत. यासाठी आज मतदान पार पडले आहे. शिवसेनेनं आपली सगळी मत आपल्याच उमेदवार दिली असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. शिवसेनेनं तिसऱ्या क्रमकांच्या पसंतीचे मत भाई जगताप यांना दिले आहे.

तर, राष्ट्रवादीने देखील आपली पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची मते आपल्या उमेदवारांना दिली आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे मत काँग्रेसच्या भाई जगताप यांना दिले आहे. व चौथ्या पसंतीची मते चंद्रकांत हांडोरे यांना दिली आहेत. त्यामुळे तिसऱ्या पसंतीच्या मतांवर काँग्रेसचा दुसरा उमेदवार भाई जगताप निवडणूक येणार का हे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा