महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या मागण्या विभागीय आयुक्तांनी फेटाळल्या…पायी वारीचा इशारा

Published by : Lokshahi News

आषाढी पालखी सोहळा विश्वस्त आणि वारकरी संघटना यांच्या मागण्या पुण्याच्या विभागीय आयुक्तनांनी अमान्य केल्या आहेत. शासनाच्या नियमानुसारच आषाढी वारी होणार असल्याचे आदेश प्रशासनाने काढले आहेत.

यंदाचा पालखी सोहळा एसटीतून पंढरीला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयाला वारकरी संप्रदयातून विरोध वाढू लागला आहे. अखिल भारतीय वारकरी भाविक संघटनेने बैठक घेऊन शासनाच्या निर्णयाला विरोध केला. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी 30 जून ला आझाद मैदानावर भजन आंदोलन करण्याचे ठरवलंय.

याही पुढे जाऊन शासनाने पायी वारीला परवानगी न दिल्यास 3 जुलैला आळंदीहून दहा दहा वारकऱ्यांच्या ग्रुप करून पंढरीची आषाढी पायी वारी करणार असल्याचे अखिल भारतीय वारकरी भाविक संघटनेचे ह भ प सुधाकर महाराज इंगळे यांनी सांगितलंय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा