महाराष्ट्र

महाबळेश्वरच्या नागरी वस्तीत शिरले पाणी…जनजीवन विस्कळीत

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप | महाबळेश्वर येथील क्षेत्र महाबळेश्वर परिसरामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी जलभरणी झाली आहे. या जलभरणीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

महाबळेश्वर तालुक्यात सगळ्यात जास्त पाऊस हा क्षेत्र महाबळेश्वर परिसरात पडला आहे. गेल्या 24 तासात 480 मिलिमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक पाऊस हा गेल्या 24 तासात महाबळेश्वर तालुक्यातील क्षेत्र महाबळेश्वर परिसरात पडला असून सगळ्यात जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरी वस्तीत पाणी शिरले असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा