महाराष्ट्र

हवामान विभागाने दिली गुडन्यूज; 'या' तारखेपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार

राज्यात जून महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विविध भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच, हवामान विभागाने गुडन्यूज दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राज्यात जून महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विविध भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच, हवामान विभागाने गुडन्यूज दिली आहे. 16 जुलैपासून राज्यात पाऊस पुन्हा बरसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दडी मारलेला पाऊस १६ तारखेपासून राज्यात पुन्हा बरसणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोकण वगळता अनेक जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, येत्या रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेने आज दिली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात रविवारपासून पाऊस जोर धरेल आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात सरासरी पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा