महाराष्ट्र

हवामान विभागाने दिली गुडन्यूज; 'या' तारखेपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार

राज्यात जून महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विविध भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच, हवामान विभागाने गुडन्यूज दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : राज्यात जून महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विविध भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच, हवामान विभागाने गुडन्यूज दिली आहे. 16 जुलैपासून राज्यात पाऊस पुन्हा बरसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दडी मारलेला पाऊस १६ तारखेपासून राज्यात पुन्हा बरसणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोकण वगळता अनेक जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, येत्या रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेने आज दिली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात रविवारपासून पाऊस जोर धरेल आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात सरासरी पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस