महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : अवकाळी पावसाचा कहर! शेतकऱ्यांवर संकटाचे सावट

महाराष्ट्रात ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसलेला असतानाच आता गारपिट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

Published by : Prachi Nate

सध्या राज्यभरात वातावरणात अनेक बदल होताना पाहायला मिळत आहेत. मार्च ते एप्रिलमध्ये कडाक्याने उष्णतेचा मारा पाहायला मिळत आहे. मात्र मे महिन्यात ज्यावेळेस उन्हाळा पुर्णपणे सुरु होतो या महिन्यात पावसाचा आणि गारपिटीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली.

त्याचसोबत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली असून राज्यात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडतो आहे. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे राज्यात पिकांचे मोठे नुकसान होताना पाहायला मिळत आहे. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान जाण्याची शक्यता आहे.

तसेच भारतीय हवामान विभागाकडून 17 जिल्हांसाठी पुढील सहा दिवस अवकाळी पावसासह, विजा आणि गारपिटीचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसलेला असतानाच आता गारपिट आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन