Koyna Dam 
महाराष्ट्र

Koyna Dam : कोयना धरणातील पाणी आता मुंबईकडे वळवणार? पाटबंधारे विभागाकडून प्राथमिक तपासणी सुरू

कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदी मार्गे अरबी समुद्रात वाहून जाणाऱ्या सुमारे ६७ टीएमसी पाण्याचा उपयोग मुंबईसाठी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

Published by : Team Lokshahi

कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात वाहून जाणाऱ्या सुमारे 67 टीएमसी पाण्याचा उपयोग मुंबईसाठी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने प्राथमिक तपासणी सुरू केली आहे.

कळंबस्ते गावाजवळ वाशिष्ठी नदीच्या काठावर दिल्लीतील एका संस्थेमार्फत मृदा व भूगर्भ चाचण्या करण्यात आल्या असून, यावर आधारित पूर्व अहवाल तयार केला जाणार आहे.

सध्या वीजनिर्मितीनंतरचे हे पाणी कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीत सोडले जाते व थेट समुद्रात मिसळते. हेच पाणी मुंबईला पुरविण्याच्या दृष्टीने सुमारे 160 कि.मी. लांबीच्या जलवाहिन्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 38 कोटी रुपये खर्चून व्हॅसकॉम कंपनीमार्फत हवाई सर्वेक्षणही झाले आहे.

या प्रकल्पासाठी वाप्कोस लिमिटेड (नवी दिल्ली) व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेबाबत कोलाड पाटबंधारे विभागाने कळंबस्ते ग्रामपंचायतीला पत्राद्वारे माहिती दिल्याचे येथील सरपंचांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेबाबत कोलाड पाटबंधारे विभागाने कळंबस्ते ग्रामपंचायतीला पत्राद्वारे माहिती दिल्याचे येथील सरपंचांनी सांगितले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा