Koyna Dam 
महाराष्ट्र

Koyna Dam : कोयना धरणातील पाणी आता मुंबईकडे वळवणार? पाटबंधारे विभागाकडून प्राथमिक तपासणी सुरू

कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदी मार्गे अरबी समुद्रात वाहून जाणाऱ्या सुमारे ६७ टीएमसी पाण्याचा उपयोग मुंबईसाठी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे.

Published by : Team Lokshahi

कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमार्गे अरबी समुद्रात वाहून जाणाऱ्या सुमारे 67 टीएमसी पाण्याचा उपयोग मुंबईसाठी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. यासाठी पाटबंधारे विभागाने प्राथमिक तपासणी सुरू केली आहे.

कळंबस्ते गावाजवळ वाशिष्ठी नदीच्या काठावर दिल्लीतील एका संस्थेमार्फत मृदा व भूगर्भ चाचण्या करण्यात आल्या असून, यावर आधारित पूर्व अहवाल तयार केला जाणार आहे.

सध्या वीजनिर्मितीनंतरचे हे पाणी कोळकेवाडी धरणातून वाशिष्ठी नदीत सोडले जाते व थेट समुद्रात मिसळते. हेच पाणी मुंबईला पुरविण्याच्या दृष्टीने सुमारे 160 कि.मी. लांबीच्या जलवाहिन्यांचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 38 कोटी रुपये खर्चून व्हॅसकॉम कंपनीमार्फत हवाई सर्वेक्षणही झाले आहे.

या प्रकल्पासाठी वाप्कोस लिमिटेड (नवी दिल्ली) व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेबाबत कोलाड पाटबंधारे विभागाने कळंबस्ते ग्रामपंचायतीला पत्राद्वारे माहिती दिल्याचे येथील सरपंचांनी सांगितले. या सर्व प्रक्रियेबाबत कोलाड पाटबंधारे विभागाने कळंबस्ते ग्रामपंचायतीला पत्राद्वारे माहिती दिल्याचे येथील सरपंचांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला; सखल भागात पाणी साचले, वाहतुकीचा खोळंबा

Latest Marathi News Update live : पत्राचाळीच्या रहिवाशांची म्हाडा कार्यालयावर निदर्शनं

Mumbai : मुंबई विमानतळावर ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटमधून कोकेनची तस्करी

Chhatrapati Sambhajinagar : बालगृहातील प्रकारानंतर राज्यभरातील बालगृहांबाबत महत्त्वपूर्ण बैठक; सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर