महाराष्ट्र

संप असताना देखील भल्या पहाटे कर्मचारी बांधावर; शेतकऱ्यांकडून कौतुक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अभिराज उबाळे | पंढरपूर : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. मात्र, राज्य सरकारी कर्मचारी संपावर असल्याने पंचनामे करण्यात अडचणी निर्माण झाले आहेत. परंतु, पंढरपूरमध्ये मात्र वेगळे चित्र पाहायला मिळत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी ग्रामसेवक, कृषी अधिकारी, तलाठी, सर्कल भल्या पहाटेच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. बळीराजाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याची सुरुवात देखील झाली आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपल्या हक्क मागण्यासाठी लढणारे कर्मचारी आपलं आंदोलन सोडून भल्या पहाटे बांधावर पोहचल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार

स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण; अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...