Mumbai  
मुंबई

Mumbai : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! धरणांमध्ये राहिला फक्त 'इतका' टक्के पाणीसाठा

अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Mumbai) उन्हाचा कडाका वाढला आहे. उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी कपात करण्यात येत असून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. पाणी परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात येत आहे तर काही ठिकाणी पाणीच येत नाही अशी परिस्थिती आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांमध्ये फक्त 18 टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. सध्या सात धरणातील पाणीसाठा १८ टक्के असला तरी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट अजून तरी दिसत नाही आहे.

जुलैपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचे नियोजन पालिकेने केले असून राज्य सरकारच्या कोट्यातूंसुद्धा पाणी उपलध्ब करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. मात्र पावसाला उशिर झाला तर मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावू शकते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा