Mumbai Water Supply 
मुंबई

Mumbai Water Supply : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! 'या' भागात 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेकडून आवाहन

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मुंबईकरांनो पाणी जपून वापरा

  • 2 दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

  • नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे पालिकेकडून आवाहन

(Mumbai Water Supply ) मुंबईत दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व बदलाची कामे सुरू करणार असल्याने हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार, 14 नोव्हेंबर सकाळी 10 वाजल्यापासून ते शनिवार, 15 नोव्हेंबर सकाळी 8 वाजेपर्यंत हा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

घाटकोपर, कुर्ला, चेंबूर आणि माटुंगा परिसर प्रभावित असणार असून 1200 मि.मी. तानसा आणि 800 मि.मी. विहार ट्रॅक जलवाहिनीवरील कामे सुरू आहेत.

एन, एल, एम पश्चिम आणि एफ उत्तर विभागांमध्ये पूर्ण पाणी बंद राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा