Vidhansabha Election

Manoj Jarange Patil : विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

विधानसभा निवडणुकीतून मनोज जरांगे पाटील यांची माघार

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली.

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. यातच काल जरांगे पाटील यांनी अंतरवालीतून उमेदवार देण्यात येणाऱ्या मतदारसंघांची घोषणा केली. यामध्ये बीड, केज, फुलंब्री, कन्नड आणि हिंगोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

मात्र मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. एका जातीवर निवडणून येणं शक्य नाही. हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. मराठा समाज बांधवांनी आपापले अर्ज मागे घ्यावेत.असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा