manoj jarange on elections 
Vidhansabha Election

Manoj Jarange: राज्यभरात 10-15 जागा लढवणार

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत आपली रणनिती स्पष्ट केली. महाराष्ट्रात एकूण 25 मतदार संघावर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

Published by : Team Lokshahi

अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची बैठक सुरु होती. विधानसभा निवडणुकीसाठी रणनिती आखण्याचे काम या बैठकीत सुरु होते. बैठकीनंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रात 15-20 जागा लढणार असल्याची माहिती दिली आहे.

मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांसोबत अद्याप चर्चा सुरु आहे. अजून अनेक मतदारसंघांबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली. असं असलं तरी उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज रात्रीत किंवा उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर करणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार? याबाबतची भूमिका स्पष्ट केली. “मोजक्याच जागा लढायचं ठरवलं आहे आणि त्या निवडून आणायचं सुद्धा ठरवलं आहे. आपण 15 ते 20 जागांवर लढायचं आहे आणि उर्वरित मतदारसंघांमध्ये आपल्या भूमिकेला विरोध करणाऱ्या उमेदवारांना पाडायचे आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली