ताज्या बातम्या

Heat Stroke Victim : राज्यात उष्माघाताचा पहिला बळी; प्रशासनाने जारी केला अलर्ट

चंद्रपूर आणि मालेगाव येथे ४० अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे.

Published by : Rashmi Mane

राज्यात उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना बुलढाणा जिल्ह्यात 12 वर्षीय शाळकरी मुलाने उष्माघातामुळे आपला जीव गमावला आहे. संस्कार सोनटक्के असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. वाढत्या उष्णतेमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर आणि मालेगाव येथे 40 अंशांपेक्षा जास्त तापमान नोंदवले गेले आहे.

संस्कार सोनटक्के शेगावच्या संत गजानन महाराज ज्ञानपीठमध्ये शिक्षण घेत होता. तो इयत्ता सहावीत होता. संस्कारला उन्हाचा त्रास झाल्याने त्याची तब्येत बिघडली. त्याला उपचारासाठी अकोल्यातील रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी उन्हात फिरणे टाळावे आणि भरपूर पाणी प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा भागात प्रशासनाने उष्णतेचा अलर्ट जारी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू