Admin
ताज्या बातम्या

16 आमदार अपात्र होणार?, राहुल नार्वेकर म्हणाले...

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विधीमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बंद दाराआड भेट घेतली

Published by : Siddhi Naringrekar

सुप्रीम कोर्टाचा निकाल 16 आमदार यांच्या अपत्रेतेचा निकाल येत असताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विधीमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बंद दाराआड भेट घेतली अशी माहिती मिळते आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या या भेटीवरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू हे मुंबईत होते. माझी भेट घेण्यासाठी ते विधानभवनात आले होते. यात काही राजकीय दृष्टीकोन नव्हता. आमदार अपात्र होणं अथवा न होणं हा निर्णय अध्यक्षांनी घेतल्यानंतर होईल. त्यासाठी सुनावणी घ्यावी लागेल. यासाठी अध्यक्षांना योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ द्या. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार अध्यक्षांनाच आहे. असे नार्वेकर म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा