ताज्या बातम्या

Mumbai Water Crisis: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 20 दिवसांचे पाणी; राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

उष्णतेची लाट जास्तच वाढत चालली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उष्णतेची लाट जास्तच वाढत चालली आहे. यात अजून एक समस्या आहे ती म्हणजे पाण्याची. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठल्याचे समजते. त्यामुळे आता मुंबईकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त पुढील 20 दिवस पुरेल एवढाच पाणी साठा राहिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त 11.76 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेकडून सरकारला अतिरिक्त पाण्यासाठी पत्र लिहिण्यात आले आहेमुंबईला मुबलक प्रमाणात पाणी मिळावं यासाठी मुंबई महापालिकेने राज्य सरकारला अप्पर वैतरणा आणि भातसा धरणातील शिल्लक पाणी मुंबईसाठी द्यावे अशी विनंती केली होती. सध्याचा पाणी साठा पाहता पाटबंधारे विभाग/राज्य सरकार यांनी राखीव साठ्यातून पाणीसाठा मुंबईसाठी मंजूर केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा