ताज्या बातम्या

अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या ई पासबाबत प्रशासनाचा मोठा निर्णय

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे. मोठ्या उत्साहात आता नवरात्रोत्सही साजरी करण्यात येणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवही निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होणार आहे. मोठ्या उत्साहात आता नवरात्रोत्सही साजरी करण्यात येणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांवर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता कोरोना काळात ई पास भक्तांसाठी सक्तीचा करण्यात आला होता. मात्र यंदा मंदिर प्रशासनाकडून ई पासबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ई पासची आवश्यकता नसणार आहे. ई पासची सक्ती उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवरात्रोत्सवाला करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा कोरोनाचे संकट कमी झाल्याने निर्बंधमुक्त वातावरणातल नवरात्रोत्सव साजरा करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाच्या वतीने तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते