ताज्या बातम्या

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर समुद्रात एक गंभीर अपघात घडला आहे. मासेमारीसाठी गेलेली एक बोट समुद्रात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Published by : Prachi Nate

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर समुद्रात एक गंभीर अपघात घडला आहे. मासेमारीसाठी गेलेली एक बोट समुद्रात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बोट कोणाच्या मालकीची आहे आणि त्यात किती जण होते, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार बोटीत अचानक पाणी शिरल्याने ती समुद्रात बुडाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीनेही शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

बुडालेल्या बोटीतील प्रवाशांचे मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, मात्र याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. दोरी आणि इतर साधनांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर खेचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, समुद्रात उधाण वाढल्यामुळे मच्छीमारांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच बचावकार्य अधिक वेगाने आणि समन्वयाने करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा