ताज्या बातम्या

Mumbai Hightide : मुंबईमध्ये हायटाइड जारी! समुद्रात मोठ्या भरतीचा इशारा

मुंबईत समुद्रात मोठ्या भरतीचा अंदाज, मुंबई हायटाइडचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात 4.75 किमी उंचीच्या लाटा येत असून मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Published by : Prachi Nate

मुंबई सह उपनगरांमध्ये आज पहाटे पासुनच पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. विजेच्या कडकडाटासह मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असुन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन महानगर पालिकेने केले आहे. मान्सुन यंदा तब्बल 12 ते 15 दिवस आधीच मुंबईसह महाराष्ट्रामध्ये दाखल झाल्याने आनंदाचे वातावरण आहे. मुंबईत पहाटेपासुनच पावसाचा जोर कायम आहे. पुढील चार ते पाच तासात वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबई आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला असुन मुंबई सह पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस चालूच राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला पोषक वातावरण मिळाले आहे. तसेच आज समुद्रात दुपारी 12 ते 12:30 च्या सुमारास समुद्रात मोठी भरती येणार असुन 4.75 किमी उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळेस 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहतील. त्यामुळे मच्छीमारांना आणि किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अलीबाग सह कोकण किनारपट्टीवर 18 दिवस समुद्राला उधाण येणार असुन त्याव वेळी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरतीच्या वेळी जर मोठा पाऊस झाला तर मुंबई ची वाहतुक व्यवस्था कोलमडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू