ताज्या बातम्या

Ratnagiri Bus Fire Accident At Kashid Ghat : मोठी बातमी! चाकरमान्यांसह मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक; प्रसंगावधानामुळे 44 प्रवासी...

रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ रविवारी पहाटे मुंबईवरून मालवणकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागली.

Published by : Prachi Nate

रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ रविवारी पहाटे मुंबईवरून मालवणकडे जाणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागली. प्रवाशी झोपेत असतानाच बसच्या टायरमधून ठिणगी उठल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सुदैवाने बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे 40 पेक्षा अधिक प्रवासी सुखरूप बचावले.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मुंबईतील अनेक कोकणवासीय कोकणात गावी जात आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. अशाच एका प्रवासादरम्यान पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कशेडी घाटातील बोगद्याजवळ ही दुर्घटना घडली.

बसचा टायर गरम झाल्याने पेट घेतला आणि काही क्षणांतच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. चालकाने तातडीने बस थांबवून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र प्रवाशांचे बरेचसे सामान डिकीत असल्याने पूर्णपणे जळून खाक झाले.

घटनास्थळी खेड आणि महाड अग्निशमन दलाचे जवान तातडीने दाखल झाले व आग नियंत्रणात आणली. दरम्यान, प्रवाशांना दुसऱ्या बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये झालेली ही दुर्घटना मोठ्या थरारक ठरली असली तरी सर्वजण सुखरूप असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या सजावटीची तयार नाही झाली, मार्केट शोधताय, तर मग 'या' ठिकाणी करा बाप्पाच्या साहित्याची खरेदी

Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन

Mumbai -Goa Highway : मुंबई–गोवा महामार्गाची नवी डेडलाईन; मार्च २०२६ पर्यंत पूर्णत्वाचा दावा

Manoj Jarange : मुंबईवर मराठा आंदोलनाची धडक! जरांगेंचा सरकारला इशारा 'मराठ्यांची औलाद काय आहे ...'