ताज्या बातम्या

Aaditya Thackeray : देशभरात स्पर्धा परिक्षांमध्ये सुरु असलेले घोळ दिवसेंदिवस वाढतच चाललेत

नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या आरोपावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, देशभरात स्पर्धा परिक्षांमध्ये सुरु असलेले घोळ दिवसेंदिवस वाढतच चाललेत. पेपरफुटीच्या घटना सातत्याने घडत आहेत. NEET च्या निकालांमधला नवीन घोळ समोर आलाच आहे. आत्तापर्यंत अनेक तरुण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षांच्या तणावाला बळी पडून आत्महत्या केल्या आहेत. हे भयंकर आहे.

देशासमोर उभा असलेला बेरोजगारीचा गंभीर प्रश्न आणि परिक्षांमधला भ्रष्टाचार ह्याचा फटका सामान्य घरातल्या मेहनती मुलांना बसतोय. भविष्य घडवण्यासाठी ही मुलं जीवापाड मेहनत करत असतात, अभ्यास करत असतात, पण अनेकदा त्यांच्या नशीबी निराशाच येते.

ना नोकऱ्या मिळतात, ना उच्च शिक्षणाच्या संधी. हे चित्र तातडीने बदलायला हवं. सगळ्यात तरुण देश असलेल्या आपल्या भारतातल्या तरुणांना न्याय मिळायला हवा! केंद्रात येऊ घातलेल्या नव्या सरकारने ह्याकडे तातडीने लक्ष द्यावं. असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Jacqueline Fernandez : दिल्ली उच्च न्यायालयाचा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला झटका; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील याचिका फेटाळली

Iran - Israel War : 'विश्वसनीय हमी दिल्याशिवाय कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'; इराणच्या राजदूतांनी दिला तेहरानच्या अटींवर भर

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Fake Crop Insurance : नांदेडमधील 'बोगस' पीक विमा घोटाळा उघड; बीडचे 9 एजंट, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावानेही विमा