महाराष्ट्रातील दुर्गम खेडे आणि आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी बस सेवा पोहोचवण्याचे स्वप्न आता सत्यात उतरू लागले आहे.
राज्य परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटले की, “आता केवळ गावात एसटी नसेल तर आदिवासी पाड्यातही एसटी सेवा पोहोचणार आहे.
” हा निर्णय महाराष्ट्रातील दुर्गम भागांतील विकासाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. यात पुढील क्षेत्रांनी भरीव निधी मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली – केरळचे अधिकृत नाव आता ‘केरळम’ केले जाणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याची माहिती दिली आणि सांगितले की, भाषेच्या आधारे राज्याचे नाव बदलण्याच्या मागणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे बदल राज्याच्या सांस्कृतिक आणि भाषिक ओळखीला अधिक योग्य ठरेल, असे अधिकारी म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सिंगापूर (Singapore) देशासोबत होणाऱ्या व्यावसायिक चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी खासदारांचा एक विशेष गट नेमण्यात आला असून, या गटाचे नेतृत्व सुप्रिया सुळे करणार आहेत.
उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासाठी सोमवारी मोठा कायदेशीर धक्का बसला.
मुंबई उच्च न्यायालयाने बँकांना फसवणुकीच्या आरोपांवर कारवाई करण्यापासून रोखणारी अंतरिम स्थगिती रद्द केली आहे.
या निर्णयामुळे बँकांना त्यांच्या कंपन्यांची खाती ‘फसवी’ म्हणून वर्गीकृत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Droupadi Murmu द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव भेटीमुळे Shegaon शेगाव शहरात उत्साहासोबतच कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. 25 फेब्रुवारी रोजी त्या बुलढाणा जिल्ह्यातील महाआरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करणार आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्र विधानमंडळ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर तातडीने चर्चा करण्याची जोरदार मागणी केली.
राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.