Abdul Sattar Team Lokshahi
ताज्या बातम्या

"3 हजार 500 कोटी रुपये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले" सत्तारांचा दावा

जालन्यात पत्रकारांशी बोलताना सत्तारांनी केलं वक्तव्य

Published by : Vikrant Shinde

रवी जयस्वाल | जालना: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना येथए पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळालेली नुकसान भरपाई, ऑनलाईन ई पीक पाहणी या विषयांवर भाष्य केलं. तर, बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टोलेबाजी केली आहे.

काय म्हणाले सत्तार?

"त्यावेळी राज्याच्या तिजोरीत खडखडाट कसा होता हे तर अजित दादांनाच माहित. राज्याच्या तिजोरीत खडखडाट नसून ती सर्वांसाठी भरलेली आहे" असं सत्तार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर "राज्यात यंदा 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळं बाधित झाले असून त्यांच्या खात्यावर 3 हजार 500 कोटी रुपयांची मदतही पोहोचली" अशी माहिती सत्तार यांनी दिली. दरम्यान ऑनलाईन ई-पीक पाहणीत बदल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचंही सत्तार यांनी म्हटलंय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा