Abdul Sattar
Abdul Sattar Team Lokshahi
ताज्या बातम्या

"3 हजार 500 कोटी रुपये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले" सत्तारांचा दावा

Published by : Vikrant Shinde

रवी जयस्वाल | जालना: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना येथए पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळालेली नुकसान भरपाई, ऑनलाईन ई पीक पाहणी या विषयांवर भाष्य केलं. तर, बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टोलेबाजी केली आहे.

काय म्हणाले सत्तार?

"त्यावेळी राज्याच्या तिजोरीत खडखडाट कसा होता हे तर अजित दादांनाच माहित. राज्याच्या तिजोरीत खडखडाट नसून ती सर्वांसाठी भरलेली आहे" असं सत्तार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर "राज्यात यंदा 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळं बाधित झाले असून त्यांच्या खात्यावर 3 हजार 500 कोटी रुपयांची मदतही पोहोचली" अशी माहिती सत्तार यांनी दिली. दरम्यान ऑनलाईन ई-पीक पाहणीत बदल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचंही सत्तार यांनी म्हटलंय.

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना