Abdul Sattar Team Lokshahi
ताज्या बातम्या

"3 हजार 500 कोटी रुपये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले" सत्तारांचा दावा

जालन्यात पत्रकारांशी बोलताना सत्तारांनी केलं वक्तव्य

Published by : Vikrant Shinde

रवी जयस्वाल | जालना: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना येथए पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, त्यांना मिळालेली नुकसान भरपाई, ऑनलाईन ई पीक पाहणी या विषयांवर भाष्य केलं. तर, बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टोलेबाजी केली आहे.

काय म्हणाले सत्तार?

"त्यावेळी राज्याच्या तिजोरीत खडखडाट कसा होता हे तर अजित दादांनाच माहित. राज्याच्या तिजोरीत खडखडाट नसून ती सर्वांसाठी भरलेली आहे" असं सत्तार यांनी म्हटलंय. त्याचबरोबर "राज्यात यंदा 27 लाख शेतकरी अतिवृष्टीमुळं बाधित झाले असून त्यांच्या खात्यावर 3 हजार 500 कोटी रुपयांची मदतही पोहोचली" अशी माहिती सत्तार यांनी दिली. दरम्यान ऑनलाईन ई-पीक पाहणीत बदल करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचंही सत्तार यांनी म्हटलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप

Share Market News : रशिया-युक्रेन युद्ध संपण्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांना दिलासा; सेंसेक्स आणि निफ्टीत वाढ

Himachal Monsoon : हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर! आत्तापर्यंत 276 नागरिकांचा मृत्यू