ताज्या बातम्या

ठाण्यातील दुर्दैवी घटनेवर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुन्हा अनागोंदी कारभार समोर आला आहे.

Published by : shweta walge

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुन्हा अनागोंदी कारभार समोर आला आहे. या रुग्णालयात एकाच रात्री 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 दिवसांत 22 रुग्ण दगावल्यानं खळबळ उडाली आहे. यावरच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या सगळ्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, गेले काही महिन्यापासून महापालिकेच्या दवाखान्यात देखील औषध खरेदीचे प्रश्न आले आहेत. कारण त्या ठिकाणी औषधं नसतात. राज्यात सर्वच क्षेत्रांमध्ये परिस्थिती बिकट आहे. आरोग्य क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, उद्योग क्षेत्र असेल एकंदरीत कारभार हा कोलमडलेला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

जयंत पाटलांना आलेल्या ईडीच्या नोटीसवर आदित्य ठाकरे म्हणाले की,

जिथे जिथे कोणी भाजपच्या वाशिंग सेंटरमध्ये गेले नाही. त्यांना नोटीस येतात. त्यामुळे ते नेते भाजपसोबत जातात. हे आता जग जाहीर आहे. देशात नाही जगात कोणालाही विचारलं तर सर्वांना माहिती आहे. सगळे भ्रष्ट लोक एका बाजूला सत्तेत बसलेले आहेत. जे येत नाही त्यांना नोटीस पाठवतात, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?