ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांच्या फडणवीसांवरील गंभीर आरोपांनंतर प्रसाद लाड यांचा जरांगेंना इशारा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलाय. मला संपविण्याचा डाव आहे.

Published by : shweta walge

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलाय. मला संपविण्याचा डाव आहे. सलाईनमधून माझ्यावर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा बामणी कावा आता चालणार नाही. मला संपवायचे असेल तर मीच सागर बंगल्यावर येतो. मला मारून टाका असे आव्हानही जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना दिलं.यावरच प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.

ते म्हणाले की, जरांगे यांनी त्यांची नोंटकी आता बंद करावी. समाजाच्या नावाखाली स्वतः च राजकीय वर्दस्त करण्याचा प्रयत्न जरांगे करत होते. त्याचा मागचा बोलविता धनी कोण हे त्यांनी सांगावे. सिल्वर ओक आहे की जालन्यातील भैय्या फॅमेली आहे.समाज आता खूष आहे. तुमच्या आता सल्ल्याची समाजाला गरज नाही.

दरम्यान, फडणवीस यांनी मराठा समाजाच्या विरोधात कट रचल्याचा आरोप करत मनोज जरांगे उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थान सांगर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे यांनी प्रथमच देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे, मी रस्त्यात मलो तरी मला सागर बंगल्यावर न्या, असे देखील जरांगे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द