ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांच्या फडणवीसांवरील गंभीर आरोपांनंतर प्रसाद लाड यांचा जरांगेंना इशारा

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलाय. मला संपविण्याचा डाव आहे.

Published by : shweta walge

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा आरोप केलाय. मला संपविण्याचा डाव आहे. सलाईनमधून माझ्यावर विष प्रयोग करण्याचा प्रयत्न आहे. त्यांचा बामणी कावा आता चालणार नाही. मला संपवायचे असेल तर मीच सागर बंगल्यावर येतो. मला मारून टाका असे आव्हानही जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना दिलं.यावरच प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली आहे.

ते म्हणाले की, जरांगे यांनी त्यांची नोंटकी आता बंद करावी. समाजाच्या नावाखाली स्वतः च राजकीय वर्दस्त करण्याचा प्रयत्न जरांगे करत होते. त्याचा मागचा बोलविता धनी कोण हे त्यांनी सांगावे. सिल्वर ओक आहे की जालन्यातील भैय्या फॅमेली आहे.समाज आता खूष आहे. तुमच्या आता सल्ल्याची समाजाला गरज नाही.

दरम्यान, फडणवीस यांनी मराठा समाजाच्या विरोधात कट रचल्याचा आरोप करत मनोज जरांगे उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील निवासस्थान सांगर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे यांनी प्रथमच देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी हवा आहे, मी रस्त्यात मलो तरी मला सागर बंगल्यावर न्या, असे देखील जरांगे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा