आजचे युग हे AIचे युग होत चालले आहे. नवनवीन तंत्रज्ञनाचा वापर करून आता अनेक गोष्टी सध्या सोईस्कर केल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे स्वारगेट प्रकरणानंतर एसटी महामंडळाने AI तंत्रज्ञानावर आधारित Smart-E-Bus बाजारात आणली आहे. यामध्ये चालकावर नजर ठेवणारे कॅमेरे Camera लावले असल्यामुळे चालकाला जर झोप आली तर अलार्म वाजणार आहे. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे अतिशय महत्वाचे पाऊल असुन याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला. मात्र या नवीन प्रणालीमुळे बसचालकांची मात्र चांगलीच झोप उडाली आहे.
एसटी महामंडळ ST Bus एकूण पाच हजार बसेस विकत घेतले जाणार असून त्यातील किमान एक हजार बसेस या E-Bus ई-बसेस असणार आहेत. या बसेस टप्प्या टप्प्याने एसटी ST महामंडळाच्या आगारात दाखल होणार आहे. पुण्यामध्ये आज स्मार्ट ई-बसेसच सादरीकरण झाले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाच्या E ई- वाहनांना जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळावे आणि जास्तीत जास्त नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या फायद्यासाठी हे धोरण एसटी महामंडळाने अंगीकारले आहे. भविष्यात स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या E-BUS ई-बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. .त्यानुसार आज उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बस E-BUSचे आज पुण्यामध्ये सादरीकरण करण्यात आले. या बसेस मध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने ही यामध्ये बदल केले आहेत.
नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे एआय तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभळ्या देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल किंवा झोपत बसेल तर लावलेले कॅमेरे मागे बसलेल्या प्रवाशांना याबाबत अलर्ट देणार आहे आणि धोक्याचा अलार्म वाजवला जाणार आहे , अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई-बसेस Smart-E-Bus मध्ये असणार आहे. महिलांच्या सुरक्षेचा विचार करता. हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे CCTV बसवण्यात येणार आहेत. तसेच बसला अचानक आग लागल्यास फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये बसवणार आहे. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणीही उघडण्याचा प्रयत्न केल्यास ती उघडली जाणार नाही आणि धोक्याचा अलार्म वाजेल अशी नवी यंत्रणा स्मार्ट ई-बस Smart-E-Bus मध्ये बसवणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.