ताज्या बातम्या

Amarnath Yatra : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, अमरनाथ यात्रेची सुरक्षा वाढवली; प्रशासनाच्या सतर्कतेत वाढ

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा थेट परिणाम वार्षिक अमरनाथ यात्रेवर झाला आहे. या हल्ल्यानंतर यात्रेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.

Published by : Team Lokshahi

जम्मू-काश्मीरमधील पर्यटनस्थळ पहलगाम येथे अलीकडेच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा थेट परिणाम वार्षिक अमरनाथ यात्रेवर झाला आहे. या हल्ल्यानंतर यात्रेसाठी नोंदणी केलेल्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या हल्ल्यादरम्यान विशिष्ट धर्माच्या पर्यटकांना लक्ष्य करत अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या गंभीर घटनांनंतर सुरक्षेसाठी 'ऑपरेशन सिंदूर' नावाची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेमुळे काही प्रमाणात स्थैर्य निर्माण झाले असले, तरी पहलगाम परिसरात अद्याप दहशतीचे सावट आहे. हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्या घटली असून, अमरनाथ यात्रेवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. यात्रेसाठी यंदा सुमारे 2.35 लाख भाविकांनी पूर्वनोंदणी केली होती. मात्र, हल्ल्यापश्चात या संख्येचा पुन्हा आढावा घेतला असता, केवळ 85 हजार लोकांनीच प्रत्यक्ष यात्रेसाठी पुढे येण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने कठोर उपाययोजना केल्या आहेत.

प्रत्येक यात्रेकरूच्या हालचालींवर नजर ठेवली जात असून, गस्त, तपासणी आणि सुरक्षेच्या मार्गदर्शक सूचनांवर काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. जम्मूपासून यात्रेच्या मार्गावर भाविकांना सुरक्षा दलांच्या सोबतीनेच प्रवास करण्याचे सुचवण्यात आले आहे. दहशतवाद्यांचा शोध अजूनही सुरु आहे आणि या हल्ल्यामागे कोण होते, त्याचे काटेकोर तपशीलही समोर आले आहेत. प्रशासन, गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस दल सर्व पातळीवर सतर्क असून, यात्रेच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा