ताज्या बातम्या

Ajit Pawar : "दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला पाहिजे, त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे"

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात जवळपास 28 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांकडून पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून मारण्यात आले. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले की, "ही जी घटना घडली त्याचा बदला घेतला पाहिजे. त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निष्पाप लोकं पर्यटनाच्यानिमित्ताने जाता आणि अशा पद्धतीने हल्ले होतात. याचा सर्वजण तीव्र शब्दात निषेध करत आहेत."

"अशा गोष्टी कदापी होता कामा नये. म्हणून ज्याच्या डोक्यातून ही गोष्ट पुढे आलेली आहे त्या सगळ्यांना पूर्णपणे संपवण्याचे काम आपली भारतीय सेना करेल याबाबत माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही." असे अजित पवार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा