ताज्या बातम्या

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

अंबादास दानवे: राजकीय प्रवासाची आठवण

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाल पूर्ण करत असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्याने अर्थातच अंबादास दानवे यांनी सभागृहात दिलेलं निरोप भाषण दिले त्यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत, “मी पुन्हा येईन,” हे विधान त्यांनी ठामपणे उच्चारलं....!

आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी सर्व सत्ताधारी व विरोधी सदस्यांचे आभार मानत त्यांनी सभागृहातील अनेक वरिष्ठ नेत्यांच्या सद्भावनांचा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, “दहावीचा निरोप समारंभ झाला होता तेव्हा जसं पुन्हा कॉलेजमध्ये जावं लागलं होतं, तसं इथेही घडेल,” अशी मिश्कील पण आशयघन टिप्पणी करत त्यांनी ‘पुनरागमनाची’ खूणगाठ बांधली.

पुढे ते म्हणाले की, "ही भूमिका संपली असली तरी हे फक्त स्वल्पविराम आहे, पूर्णविराम नाही,” हे शिंदे साहेबांचं विधान सांगत त्यांनी राजकीय पुनरागमनाची नोंद ठेवल्यासारखं केलं. देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचं सहकार्य आणि अनुभवानं स्वतःला समृद्ध केल्याचं त्यांनी मान्य करत, “मी विचारांवर ठाम राहिलो, पण कधीही व्यक्तिवर टीका केली नाही,” असं ठामपणे नमूद केलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा