ताज्या बातम्या

अमित शाह यांच्या 'त्या' टीकेवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे. असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. यावर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, उद्धवजी ठाकरे साहेब आणि शिवसेना यांच्यावर टीका केल्याशिवाय तुमच्या सभेला कोणताही अर्थ उरत नाही. शिवसेनेवर टीका करायची, राष्ट्रवादीवर टीका करायची अशा पद्धतीने भाजपचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. ज्याअर्थी शिवसेनेवर आणि उद्धवजी ठाकरे साहेबांवर टीका केली जाते त्याअर्थी जर तुम्ही शिवसेनेला नकली म्हणता. ज्या नकली शिवसेनेचे उंबरठे तुम्ही कित्येकवेळा झिजवले आहेत.

यासोबतच दानवे पुढे म्हणाले की, आता या शिवसेनेला नकली म्हणत असताना जर असली तुमच्यासोबत आहेत. तर या असलीचे हाल तुम्ही काय केलं? असलीला 10जागा सुद्धा अजून दिलेल्या नाहीत. या असलीचे उमेदवार देखील तुम्ही ठरवता. तुम्हाला शिवसेना अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या पाया पडणारी पाहिजे होती. परंतु या महाराष्ट्रातील एक तमाम जनतेचा आवाज असणारी, महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनगटामध्ये धमण्यामध्ये रक्त सळसळ करणारी शिवसेना जी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते. ही तुम्हाला कधीही शरण येणार नाही. स्वाभिमानानं तुमच्याविरुद्ध लढा देईल आणि नुसता लढा देणार नाही तर हा लढा जिंकण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि निश्चित तो जिंकू. असे अंबादास दानवे म्हणाले.

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...