ताज्या बातम्या

अनिल देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; पत्रात काय?

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रीक निवडणुकीमध्ये आपल्या भाजपा पक्षाचा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला होता. यात प्रामुख्याने राज्यातील शेतकऱ्यांवर असलेले संपूर्ण कर्ज माफ करण्याचे आश्वासन सुध्दा देण्यात आले होते.

सरकार स्थापन होवून आता महिना उलटून गेला आहे. परंतु आपण शेतक-यांना दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी कोणत्याही हालचाली दिसून येत नाही. राज्यात आपले सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अपेक्षा होती की त्यांच्यावरील संपूर्ण कर्ज माफी होईल. परंतु असे होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.

तरी आपण विधानसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांना दिलेल्या संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करुन राज्यातील सर्वच शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करावा, ही विनंती. असे अनिल देशमुख यांनी पत्रात म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : नांदेडमध्ये परिचारिका संघटनेचे काम बंद आंदोलन

Jitendra Awhad vs Gopichand Padalkar : विधानभवनातील गोंधळावर उद्धव ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया; "गुंडांना पास कोणी दिले, याचा शोध घ्या....!

shravan 2025 : महाराष्ट्रात 25 जुलैपासून शुभारंभ, चार श्रावणी सोमवारांसह सणांचा महापर्व, जाणून घ्या...

Awhad VS Padalkar : विधिमंडळातील गोंधळानंतर फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया, "सभापतींनी गंभीर दखल घ्यावी"