ताज्या बातम्या

Anna Hazare On Dhananjay Munde : 'आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून राजीनामा दिला पाहिजे'; अण्णा म्हणाले.

अण्णा हजारे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यास जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची मागणी केली आहे. जाणून घ्या अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया.

Published by : Prachi Nate

बीड सरपंच हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप असताना त्यांच्या राजिनाम्याची मागणी होत आहे. तसेच माणिकराव कोकाटे यांना देखील न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आरोप झाले तर जबाबदारी म्हणून पहिले आपण राजीनामा दिला पाहिजे. नाव न घेता समाजसेवक अण्णा हजारेंचा माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेवर प्रहार?; मंत्री मंडळातील मंत्र्यांवर बोलतांना अण्णांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अण्णा हजारे म्हणाले की, "मंत्रिमंडळात राहून ज्यावेळेस आरोप होतात त्यावेळेस एक क्षण सुद्धा पदावर राहण दोष आहे. लगेच राजीनामा देऊन मोकळ व्हायचं ही आपली जबाबदारी आहे. अशे मंत्री जे मंत्रिमंडळात घेतात त्यांनी आधीच विचार करायला हवा. सुरुवातीला हेच चुकत आणि चुकल्यानंतर अशा या घटना घडतात. त्याच्यामुळे राज्याचा नुकसान होतो, देशाचा नुकसान होतो, समाजाचा नुकसान होतो. याचा विचार करण गरजेच आहे".

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा