ताज्या बातम्या

Mohan Bhagwat : 'हिंदू नाव लावणाऱ्यांना देशाप्रति कटिबद्ध राहावं लागेल'; सरसंघचालक मोहन भागवत यांचं संबोधन

आरएसएस स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असताना संघप्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं की “हिंदू” नाव लावणाऱ्यांना देशाप्रती कटिबद्ध राहावं लागेल.

Published by : Team Lokshahi

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असताना संघप्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट केलं की “हिंदू” नाव लावणाऱ्यांना देशाप्रती कटिबद्ध राहावं लागेल. देशातील ऐक्य आणि समाजपरिवर्तनाचाही त्यांनी यावेळी ठाम संदेश दिला. एकरूपतेची सक्ती आवश्यक नसल्याचं सांगत त्यांनी म्हटलं की विविधतेतूनच खरी एकता दिसून येते.

दिल्लीतील विज्ञान भवन येथे ‘आरएसएसची 100 वर्षांची यात्रा : नवे क्षितिज’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी भागवत म्हणाले की भारतमातेप्रती समर्पण आणि पूर्वजांची परंपरा हीच खरी प्रेरणा आहे. आपला डीएनए एकच असून, सौहार्दाने राहणं हीच भारतीय संस्कृती असल्याचं ते म्हणाले.

भागवत यांनी नमूद केलं की स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत भारताला जे आंतरराष्ट्रीय स्थान मिळायला हवं होतं ते अद्याप मिळालेलं नाही. त्यामुळे आता जगात भारताने महत्त्वाची भूमिका बजावण्याची वेळ आल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या प्रगतीसाठी केवळ सरकार किंवा राजकीय नेत्यांची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची आहे, असंही ते म्हणाले.

समाजपरिवर्तन हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचं भागवत यांनी सांगितलं. त्यांनी स्पष्ट केलं की प्राचीन काळापासून भारतीयांनी कधीच भेदभाव केला नाही, कारण सर्वत्र एकाच दिव्यत्वाची जाणीव होती. ‘हिंदू’ हा शब्द परकीयांनी दिलेला असला तरी हिंदू म्हणजे स्वतःचा मार्ग जगत इतरांचा सन्मान करणारे लोक. ते संघर्षापेक्षा समन्वयाला महत्त्व देतात, असं भागवत म्हणाले.

यापूर्वी आरएसएसचे प्रचार व माध्यम प्रमुख सुनील आंबेकर यांनी माहिती दिली की, या तीन दिवसीय व्याख्यानमालेत मोहन भागवत समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधणार असून देशासमोरील महत्त्वाच्या प्रश्नांवर आपली मते मांडतील.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pune Bhausaheb Rangari Ganpati : ढोल-ताशांचा गजरात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान

CM Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : उद्धव ठाकरे नंतर मुख्यमंत्र्यांची शिवतीर्थावर उपस्थिती, नेमकं प्रकरण काय?

Manoj Jarange Azad Maidan : "माझ्या वडिलांना काय झाले तर त्याला..." जरांगेंच्या मुलीचा सरकारला इशारा

Eknath Shinde on Manoj Jarange Protest : "सरकार सर्व जातीपातीचा विचार..." जरांगेंच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया