भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्कार सोहळ्यात रावसाहेब दानवे उपस्थित होते. फुलंब्री येथे आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी जोरदार भाषण केले.
त्यावेळी त्यांनी एक विधान केले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोडी होऊन इतर औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील. असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.