ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधव यांचा राजीनामा मागे

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेतला. ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज तो मागे घेतला आहे.

Published by : shweta walge

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर अविनाश जाधव यांनी हा निर्णय घेतला आहे. काल त्यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी आज तो मागे घेतला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मनसेच्या उमेदवारांचा पराभव झाल्याने त्यांनी राजिनामा दिल्याचे म्हटले आहे. अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते. परंतु त्यांचा देखील पराभव झाला होता.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील तब्बल १२८ उमेदवार राज्यभरात विविध मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. मात्र, १२८ उमेदवारांपैकी एकही उमेदवार निवडून आला नाही. त्यामुळे या निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक