सूरज दहाट, अमरावती
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता बच्चू कडू यांनी म्हटले आहे की, पैसा मायेची सेवा नाही करु शकत. मायेची सेवा करायला आमचं मन तयार पाहिजे. चांगले विचार पाहिजे. साडे सतरा रुपयांची साडी देऊन त्या मेळघाटाची बेईज्जती करुन टाकली.
2 कोटीच्या गाडीत फिरायचं आणि साडे सतरा रुपयांच्या साडीमध्ये लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था तोडून टाकावी लागेल. 17 रुपयांची साडी मतपरिवर्तन नाही करु शकत. असे बच्चू कडू म्हणाले.