आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दोन दिवसांपूर्वी विधीमंडळ परिसरात राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. ज्या सभागृहात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून अनेक दिग्गजांनी नेतृत्व केलं आहे. त्यांचा पुतळा ज्या परिसरात आहे, त्याच परिसरात हे जोडे मारण्याचे काम केले असे अजित पवार म्हणाले.
तसेच राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणाऱ्यांवर कारवाई करा . अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. अशी घटना कोणत्याही राष्ट्रीय नेत्यांच्या बाबतीत घडता कामा नये हे सांगितले. असं जर कोणी केलं तर त्यांना निलंबीत केलं पाहिजे. असे अजित पवार म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी जे घडलं, ते आपल्या विधानसभेच्या इतिहासात दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आज आमचे राष्ट्रीय नेते आहेत, उद्या त्यांच्याकडेही राष्ट्रीय नेते आहेत. आज आमच्याकडेसुद्धा पायताणं आहेत हे विसरून चालणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करता अध्यक्षांनी कडक अशी कारवाई करावी. असे बाळासाहेब थोरात म्हणाले.