ताज्या बातम्या

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराड सूत्रधार; बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे समोर आले आहे. बाळासाहेब थोरात यांनी आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : shweta walge

सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीकडून १५०० पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून खंडणीच्या प्रकरणातूनच ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराडच असल्याचे समोर आले आहे. यावरच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे की, गुन्हेगाराला दहशत बसली पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात ?

संतोष देशमुख हत्या प्रकरणी कोण दोषी असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. यामध्ये वाल्मिक कराड दोषी असेल मास्टर माईंड असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. बीड घटनेप्रकरणात जे जे सहभागी असतील त्यांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे की, गुन्हेगाराला दहशत बसली पाहिजे.

धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काय म्हणाले?

धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र योग्य निर्णय त्यांनी घेणं आवश्यक आहे. काँग्रेसच्या काळात आरोप झाल्यानंतर राजीनामे झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांचे राजीनामे झालेले आहेत. हा विषय नितीमत्तेचा असतो आणि ती पाळली पाहिजे.

महायुती सरकारमध्ये बिलकुल अलबेल नाही. निवडणुकीच्या पुर्वी सुद्धा प्रंचड गोंधळ झालेला आहे. अनेक चुकीची कामं केली गेली आहेत. अनेक कामांचे इस्टीमेंट वाढवण्यात आले. ही वस्तुस्थिती आहे. पैसा उभा करण्यासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्या गोष्टी बाहेर येत आहेत. आताही सरकारमध्ये गोंधळाची अवस्था आहे. पालकमंत्री सुद्धा नेमू शकत नाहीत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Monorail : मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार; MMRDAने घेतला महत्त्वाचा निर्णय