ताज्या बातम्या

बारसू रिफायनरी प्रकल्पसाठी कोयना अवजल वापरणार

बारसू रिफायनरी प्रकल्पसाठी कोयना अवजल वापरणार

Published by : Siddhi Naringrekar

निसार शेख, चिपळूण

तब्बल १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचा कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आता पाकिस्तानात जाणार असून सौदी अराम्कोने या तेल कंपनीने त्यासाठी ग्वादर शहराची निवड केल्याची बातमी एका दैनिकाने दिली आहे. त्यावरून भाजपचे आमदार तथा पक्षाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी ठाकरे गटाच्या नेत्यावर हल्लाबोल केला आहे. 'उबाठा'ने या 'रिफायनरी'ला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली? असा सवालच त्यांनी केला आहे.

आमदार शेलार यांनी याबाबत थेट शिवसेनेच्या ठाकरे गटाला जबाबदार धरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कोकणात रिफायनरी प्रकल्प ग्रीन प्रोजेक्टच होता. तो प्रकल्प आता पाकिस्तानकडे जात आहे, अशा बातम्या येत आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात आकांडतांडव करणारे ठाकरे गटाच्या नेत्यांना यातून काय मिळाले, याचे उत्तर देतील का. या प्रकल्पातून हजारो लोकांना रोजगार मिळणार होता. आता हा प्रकल्प पाकिस्तानकडे गेला तर काय मिळाले, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

त्यानंतर रिफायनरी बाबत एक मोठी घडामोड समोर येत आहे बारसू रिफायनरी प्रकल्प यासाठी कोयनेचे अवजलचे पाणी वापरले जाणार आहे त्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून जीओ इन्फो कंपनीकडून सर्वेक्षण सुरू आहे 1 कोटी 90 लाख रुपये खर्च सर्वेक्षणसाठी करण्यात येणार आहे तर आतापर्यंत 140 किलो मिटर सर्वेक्षण पूर्ण झाले आहे चिपळूण ,संगमेश्वर,रत्नागिरी, लांजा आणि राजापूर अशा तालुक्यातून 160 किलो मीटर पेकी 90 टक्के पाईप लाईन जाणार आहे त्यामुळे कोकणात ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार हे जवळपास निश्चित झाले आहे .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक